संस्थेविषयी

आमच्याकडे 10+ वर्षांचा अनुभव आहे

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 2012 साली व्यंकटेश मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सुरु करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत सोसायटी महाराष्ट्र राज्यात बँकिंग सेवा पुरवत आहे.


ISO 9001:2008 मानांकन मिळवून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आधार बँकिंग, SMS बँकिंग, मायक्रो ATM, इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत सोसायटीने नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

व्हिजन , मिशन आणि मूल्ये

व्हिजन

उद्योग व्यवसाय तथा नागरिकांना मदत करून सर्वांना बुलंद भारत निर्माणसाठी सक्षम व समृद्ध करणे..

मिशन

जीवनस्तर उंचावण्यासाठी लोकांना समान संधी उपलब्ध करून देणे.

मूल्ये

ऐक्य भावनेने सामाजिक तत्वांचे पालन करत आणि इतरांनाही सोबत घेऊन प्रगती करणे.

अध्यक्षांचे मनोगत

अध्यक्षांचे मनोगत

कृष्णा मसुरे

चेअरमन

मित्रहो, अहमदनगर जिल्ह्याच्या परिघातील लाखो लोकांचा गेल्या १० वर्षांपासून भक्कम आर्थिक आधार स्तंभ असलेली संस्था म्हणजे व्यंकटेश मल्टीस्टेट. विश्वासाने इथं यावं, सोप्या रीतीने बँकिंगचे कामं करावेत आणि सहजगत्या मैत्रीपूर्ण नातं तयार व्हावं इतका सुंदर प्रवास या १० वर्षात घडला. हे नाते अधिक बळकट करण्यासाठी व्यंकटेश परिवाराचे सदस्य सदैव झटत असतात. त्यांच्या या मेहनतीला जोड मिळते ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाची, जेणेकरून सर्व बँकिंग व्यवहार जलदगतीने पूर्ण व्हावे. आपल्या विश्वासाच्या बळावर संस्थेने अनेक नामांकित पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे.

आज व्यंकटेश मल्टीस्टेटच्या कामकाज पद्धतीला  बऱ्याच अर्थ संस्था आदर्श मानतात. याशिवाय व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या बाबतीतही संस्था अग्रेसर आहे.'नातं विश्वासाचं, वचन सुरक्षेचं' या बोधवाक्याला सतत डोळ्यासमोर ठेवून सुरु असलेली व्यंकटेश मल्टीस्टेटची ही वाटचाल पुढेही अनेक दशकं अशीच सुरू राहील याची आम्हाला खात्री आहे.